Monday 24 August 2015

चोरू लागले लोक " कांदे ",

चोरू लागले लोक " कांदे ",
" शेअर बाज़ार " झोपला ग बाई !
"मोदी" बाबांचे झाले वांदे ,
" अच्छेदिन " काही येत नाही !
                  धनंजय जुन्नरकर 

                  सचिव, मुंबई काँग्रेस 

Wednesday 12 August 2015

ढोंगी मोदी -खोट्या सुषमा स्वराज

ढोंगी मोदी -खोट्या सुषमा स्वराज
👎🙆👎🙆👎🙆👎🙆👎
सुषमा स्वराज यांनी विरोधी पक्षाच्या विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे न देता क्वात्रोची आणि एंडरसन का पळाले हे विचारून काँग्रेस वर आरोप करत राहिल्या. या घटनांमध्ये जर काँग्रेस दोषी असेल तर त्यांची चौकशी करून फाशी द्या . परंतु वाजपेयींचे सरकार केंद्रात सत्तेत असताना आणि आताही बहुमतात असताना कोणतीही चौकशी करायचा नाही ही भाजपाची लबाडी सगळ्यांना कळायला लागलेली आहे.बोफोर्स च्या बाबतीतही हिच नाटके केली . शेवटी यांच्या गाढवपणा पाई घडलेल्या कारगिल युद्धात बोफोर्स तोफा च कामाला आल्या. त्या नसत्या तर पाकिस्तान ने कारगिल वर केंव्हाच कब्जा केला होता . एवढेच कांड चालू असताना नरेंद्र मोदी नेहमी प्रमाणे संसदेतून ग़ायब होते . त्यांच्या पळपुटेपणा मुळे लोकांना सत्य समजले . 
                      धनंजय जुन्नरकर 
                    सचिव ,मुंबई काँग्रेस

Tuesday 11 August 2015

क्रांती ची सूरवात आणि माजलेल्या मोदी सरकारचा सूर्यास्त आम्हीच करणार !!!!

क्रांती ची सूरवात आणि माजलेल्या मोदी सरकारचा सूर्यास्त आम्हीच करणार !!!!
✊✌️✊✊✌️✊✊✌️✊✊✌️

खोट्या आणि लबाड माणसांना खूप राग येतो! त्यांना स्वतःच्या अधिकारांची जाणीव असते परंतु विरोधी पक्षाच्या निवडून आलेल्यांना आपण विरोधी पक्षाचे अध्यक्ष पद नाकारतो याची त्यांना कल्पना नाही काय ?मोदी संसदेत जनते च्या प्रश्नांवर मूग गिळून गप्प बसतात तेंव्हा यांना राग येत नाही .यांचे खासदार धार्मिक विद्वेश पोहचविणारी विधाने करतात तेंव्हा यांना राग येत नाही . याचाच आम्हाला राग येतो . 4 जण440 जणांना दमवत असतील तर आम्हाला त्यंाचा अभिमान आहे !क्रांती ची सूरवात आणि माजलेल्या मोदी सरकारचा सूर्यास्त आम्हीच करणार !!!!

                 धनंजय जुन्नरकर
                सचिव, मुंबई काँग्रेस

ग्रीन कॉरीडॉर आणि यम कॉरीडॉर


ग्रीन कॉरीडॉर  आणि यम कॉरीडॉर  

हृदय प्रत्यारोपण करण्यासाठी नवी मुंबई ते फोर्टिस हॉस्पिटल आणि अंधेरी विमान तळ ते फोर्टिस हॉस्पिटल हे अंतर १५ मिनटात कापून वाहतूक पोलिसांनी ०२ जणांचे प्राण वाचविले हे अतिशय चांगले काम केले आहे त्या बद्दल त्यांचे आभार मानावे तेवढे थोडेच आहे . वाहतूक सह आयुक्त मिलिंद भारंबे यांनी या कामी मोलाची भूमिका बजावली त्या बद्दल त्यांच्या संपूर्ण टिमचे अभिनंदन ! 
आपण ग्रीन कॉरीडॉर करू न वाहतूक पाहिजे तेंव्हा पाहिजे तशी सुरळीत आणू शकतो हे मुंबईकरांना कळले , फक्त पोलिसांनी मनात आणायला हवे हा ही संदेश यातून गेला आहे . मिलिंद भारंबे हे धडाडीचे अधिकारी आहेत त्यांना मुंबई आणि मुंबईला जोडणाऱ्या महामार्गांच्या वाहतुकीच्या समस्या सोडवता येतील अशा काही सूचना कराव्याश्या वाटतात , जेणे करून वाहतूक सुरळीत चालेल ,अपघात कमीतकमी होतील आणि बहुमुल्य इंधनही वाचेल . 
१) महामार्गांवर रिक्षा ,ट्रक ,टेम्पो हे ५० ते ६० च्या स्पीड मध्ये रस्त्याच्या उजव्या बाजूने वाहन चालवत असतात ,.  यांच्या मुळे मागून येणाऱ्या गाड्या झक मारून हळू चालवाव्या लागतात . त्यानंतर पुढे ओव्हर टेक करावा लागतो , यात अपघाताची शक्यता वाढते . या रिक्षा ,ट्रक ,टेम्पो च्या पुढचा रस्ता बऱ्याच वेळा संपूर्ण मोकळा असतो परंतु गरज नसताना उजवी बाजू वापरून सर्व रस्ता अडवला जातो . 
२) महामार्गाच्या कडेला बऱ्याच वेळा लोक गाड्या उभ्या करून टाईमपास करत असतात , मागून वेगात येणाऱ्या गाड्यांना यामुळे बराच त्रास होतो ,
३)तसेच गोटी सोडा ,हेल्मेट , मडकी , निरनिराळी खेळणी विकाणार्यांचे अनधिकृत धंदे लोकांच्या मृत्यूचे कारण बनत आहेत पण थोडे पैसे घेऊन तिकडे पोलीस दुर्लक्ष करतात . 
४) लोक अचानक त्यांच्या गाडया घेऊन चुकीच्या दिशेने वेगात गाडी चालवतात त्यांच्या कडेही दुर्लक्ष केले जाते . 
५) आपल्या स्थानिक वाहतूक चौक्यांतील आलेल्या तक्रारीचा त्वरित निपटारा करायचे जर पोलिसांनी मनावर घेतले तर रोजच्या वाहतूक कोंडीतून जिवंत हृदय घेऊन जाणाऱ्या आम्हा सामान्य माणसांना ग्रीन कॉरीडॉर  मध्ये प्रवास केल्याचा आनंद मिळेल 
६) वाहतूक सुरक्षा दिन किंवा सप्ताह हे अपवाद म्हणून साजरे करण्यापेक्षा ती सवय केली तर मग सध्याचे यम कॉरीडॉर  आपोआप ग्रीन कॉरीडॉर होतील यात शंका नाही . 
धनंजय जुन्नरकर 
९९३०७५४४४ बोरीवली , मुंबई 

Sunday 9 August 2015

कुठे स्व . राजीव गांधी ,कुठे मोदी ड्रामा ( नागा बंडखोरी विरुध्द )
अजून समझोत्याची कलमेही ठरली नाहीत तरी नागा लोकांचा ड्रेस घालून पंतप्रधान दिखावाबाजीला तयार ! असा कोणताही समझोता संध्याकाळी ७ वाजता होणार आहे याची कल्पना गृहमंत्री राजनाथ सिंह यांना साडेचार वाजेपर्यंत माहित देखील नव्हते . जेथे नागा लोकांची वस्ती आहे त्या आसाम ,मणिपूर ,आणि अरुणाचल प्रदेश च्या मुख्यमंत्र्यांना या बाबत काही माहीतही नाही . हे तिन्ही प्रदेश मिळून नागा लोकांना ग्रेटर नागा प्रदेश बनवायचा आहे हे कधीही शक्य नाही . अशा प्रकारे देश चालवणार काय ? स्व . राजीव गांधी यांनी पंजाब ,आसाम , मिझोराम यांच्याशी ऐतिहासिक करार केले . त्यानंतर त्या प्रदेशातील परिस्थिती सुधारली . येथील वंशवाद ,फुटीरता संपली . हे करार गोपनीय नव्हते . प्रसिद्धी साठी नव्हते . ठोस करार होते . त्यांचा आजही आधार मानला जातो . राजीव गांधींना असा ड्रामा करायची गरज वाटली नाही . ज्याच्या कडे बुद्धीची कमतरता असते तो दिखावा अधिक करतो हे सत्य पुन्हा उघड झाले . 

Friday 7 August 2015

ड्रामेबाज सुषमा स्वराज

ड्रामेबाज सुषमा स्वराज 
पळपुट्या ललित मोदी ला मदत करणे मानवता आहे तर मग हे वाचा . 
सुषमा स्वराज यांनी २००४ ,मध्ये मा सोनियाजी गांधी ह्या जर  पंतप्रधान बनल्या तर मी केशवपन ( डोक्यावरील केस कापणे ) करेन असे जाहीर केले होते . तेव्हा एक महिला लग्न झाल्यावर  भारतीय संस्कृती प्रमाणे  तिच्या सासरच्या नात्यात आपले सर्व आयुष्य समर्पित करते ज्या महिलेच्या सासूची निर्घुण हत्या झाली ,जिच्या पतीला बॉम्बने उडवून देण्यात आले ,त्याच्या शरीराचे सर्व  तुकडे देखील सापडले नाहीत . अशा आघातांनी  देशात राहून भारतीय लोकाशाही च्या मार्गाने निवडून येऊन  ज्या पंतप्रधान झाल्या तर मी केस कापीन हे एक भाजपची महिला म्हणते हे भारताला लाजीरवाणे होते  हे देश विसरला काय ? तेंव्हा आपण एका पात्र भारतीय नागरिकावर अन्याय करत आहोत असे सुषमा स्वराज यांना वाटले नाही काय ? 

Tuesday 4 August 2015

वैचारीक दरिद्रता युक्त " गिरीश कुबेरजी " संपादक ,लोकसत्ता . /लोकसत्ताच्या संपादकीय लेखांच्या" सुमार सद्दीचा पाठ पुरावा ",

वैचारीक दरिद्रता युक्त " गिरीश कुबेरजी  "
संपादक ,लोकसत्ता .                                                                                                                              
                                                                                                                                धनंजय जुन्नरकर 
 सचिव ,मुंबई विभागीय काँग्रेस कमिटी 
                                                                                                                                   9930075444
  
नमस्कार ! आपला सोमवार दिनांक ३ ऑगष्ट रोजी " सुमार सद्दिचि सुरवात " हा अग्रलेख वाचला . नावात कुबेर असले म्हणजे बौद्धिक  सर्वच गोष्टी आपल्या कडे मुबलक आहेत असा आपला  समज झालेला दिसतो . संपादक झालो म्हणजे जगाला अक्कल देण्याचा परवाना मिळाला या भावनेतून अग्रलेख लिहिण्याचे काम जेव्हा संपादक करू लागतो तेव्हा त्याची वाचकांशी असलेली नाळ तुटायला लागते . नाळ तुतण्याआधी गिरीशजींची नाळ वाचकांसोबत जुळली होती काय हा आमच्या समोरील महत्वाचा प्रश्न आहे . -
सुमारसद्दीची सुरवात या आपल्या (नेहमी प्रमाणेच्या )फडतूस अग्रलेखात काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष मा ऱाहुल गांधी यांच्या संदर्भात- राहुल बाबा , संबोधून निरनिराळे दाखले देऊन टीका करण्याचा जो बाळबोध प्रयत्न केला आहे तो अतिशय हास्यास्पद आणि लाजीरवाणा आहे . 
काल परवाच  लोकमान्य टिळक यांची  पुण्यतिथी साजरी झाली . टिळक ,आगरकर , प्र. के. अत्रे  या महाराष्ट्रा ने देशाला दिलेल्या मोठया देणग्या होत्या . त्यांचे अग्र लेखवाचले असते तर  संपादकीय कसे असावे याची माहिती कुबेरांना झाली असती . भाजप नेत्यांच्या मांडीवर बसून कॉंग्रेस च्या विरुध्द आपला वैचारिक दरिद्री बोरू झिजवायचा हाच सध्या एक कलमी  आपला कार्यक्रम  दिसत आहे . 
आपण लोकसत्ताचे संपादक आहात ,परंतु आपण स्वतः लोकसत्ता वाचता किंवा काय या विषयी शंका आहे . आपल्या पान क्र ७ वरील एक परिच्छेदाच्या माहितीवर गजेंद्र चौहानांची नियुक्ती हि बातमी प्रसिध्द झाली आहे . त्यावरून त्यांना कसे विद्यार्थ्यांवर लादले जात आहे हे लोकांना समजले आहे . एफ टीआय आय वरील गजेंद्र चौहान यांची नियुक्ती , चि . राहुल बाबांना भले सुमार वाटो , - असे जेंव्हा आपण म्हणता तेंव्हा ती आपल्याला सुमार वाटत नसावी हे वाचकांना समजत नाही असे आपणाला वाटते काय ? सत्ताधाऱ्यांना विरोध करायचे हे कारण आपल्या लेखी फुसके असेल परंतु विद्यार्थ्यांच्या दृष्टीने तो आधार आहे . विध्यार्थ्यांना हि नियुक्ती बदला म्हणण्याचा अधिकार नाही हे म्हणून आपली नसलेल्या बुद्धीची कुवत आपण दाखवत आहात असे वाटते . हा अधिकार मागणे हि विद्यार्थ्यांची मुजोरी झाली असे लिहिताना आपला स्वाभिमान आपण आर. एस . एस . च्या शाखेत गहाण ठेवला की काय असे वाटते . कारण त्यांना ही ह्या बाबी हिंदू विरोधी वाटतात . कोंडी फुटण्यासाठी , चि. राहुल बाबांनी काही केले नाही असे आपल्याला वाटते , परंतु राहुल गांधी यांनी त्या बाबत मोदी सरकारने मन मोठे करावे हे सांगितल्याचे आपण सोयीस्कर रित्या विसरलात . २५० विद्यार्थी आणि एक बलवान सरकार यांच्यात विद्यार्थ्यांनी मनाचा मोठे पणा दाखवावा , की  सरकारने ? ,-  याची जाणीव ना सरकारला ना आपल्याला . "राजीनामा दयायला हे काही युपिए सरकार नाही " , असे कथीत थोर नेते राजनाथसिंह ह्यांनी सांगितलेले आहेच . जेथे हे सरकार भ्रष्टाचार करून राजीनामा देणार नाही हे स्पष्ट करते ते लोक अशा सुमार दर्जाच्या नियुक्त्या करून विद्यार्थ्यांची बौद्धिक वाताहत करत आहेत असे आपणाला वाटत नाही काय ? पक्षाच्या अंतर्गत बाबी ,परिस्थिती ,समीकरणे आणि घेतलेले निर्णय यांची बरोबरी विद्यार्थ्यांच्या रास्त मागणी सोबत करावी याने आपली वैचारिक दिवाळखोरी सिद्ध होते . 
याकुबला फाशी दिली हे उत्तम झाले असे ओवेसी म्हणत नाही ,तो गुजरात कांडाच्या आरोपींना फाशी कधी मिळणार असे भरकटणारे विधान करतो ,तद्वतच आपण देखील पात्रताहिन गजेंद्र चौहान यांची नियुक्ती सरकारने मागे घ्यावी असे म्हणत नाही , भलत्याच गोष्टींशी तुलना करण्यात बहुमोल वेळ वाया घालवत आहात . 
तसे पहिले तर आपण या पदावर आल्यापासून वेळ वाया घालाविण्याचेच काम करत  आहात हे वाचकांच्या केंव्हाच ध्यानी आलेले आहे . अरुण टिकेकर आणि कुमार केतकर  यांच्या सारख्या विद्वान लोकांनी लोकसत्ताच्या संपादक पदाची शान वाढविली होती , तेथे आपल्या सारख्या  "सुमार "दर्जाच्या वैचारिक पात्रतेच्या माणसाला बसविले त्याला लोकसत्ताचे वाचक विरोध करू शकत नाहीत कारण  "एक्स्प्रेस ग्रुप " खासगी संस्था आहे . तेथे कुणालाही आणून बसविण्याचा त्यांचा अधिकार आहे . परंतु एफ टीआय आय  ही काही कुणाच्या बापजाद्याची मालकी हक्क दाखविणारी संस्था नाही ,त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मागणीला मुजोरी मागणी म्हणण्याचा तुम्हाला कोणताही अधिकार नाही . पक्ष म्हणून घेतलेल्या चुकीच्या निर्णयांची शिक्षा काँग्रस भोगेल , व चूक दुरुस्त देखील करेल पण त्या साठी विद्यार्थांचे भवितव्य ,दिवस ,वेळ वाया घालविणाऱ्या सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय ? असा अग्रलेख लिहायला आपल्याला काही जमेल असे वाटत नाही . 
कळावे , धन्यवाद 


आपला स्नेहांकित 


धनंजय जुन्नरकर 
सचिव ,मुंबई विभागीय काँग्रेस कमिटी 
9930075444