Tuesday 4 August 2015

वैचारीक दरिद्रता युक्त " गिरीश कुबेरजी " संपादक ,लोकसत्ता . /लोकसत्ताच्या संपादकीय लेखांच्या" सुमार सद्दीचा पाठ पुरावा ",

वैचारीक दरिद्रता युक्त " गिरीश कुबेरजी  "
संपादक ,लोकसत्ता .                                                                                                                              
                                                                                                                                धनंजय जुन्नरकर 
 सचिव ,मुंबई विभागीय काँग्रेस कमिटी 
                                                                                                                                   9930075444
  
नमस्कार ! आपला सोमवार दिनांक ३ ऑगष्ट रोजी " सुमार सद्दिचि सुरवात " हा अग्रलेख वाचला . नावात कुबेर असले म्हणजे बौद्धिक  सर्वच गोष्टी आपल्या कडे मुबलक आहेत असा आपला  समज झालेला दिसतो . संपादक झालो म्हणजे जगाला अक्कल देण्याचा परवाना मिळाला या भावनेतून अग्रलेख लिहिण्याचे काम जेव्हा संपादक करू लागतो तेव्हा त्याची वाचकांशी असलेली नाळ तुटायला लागते . नाळ तुतण्याआधी गिरीशजींची नाळ वाचकांसोबत जुळली होती काय हा आमच्या समोरील महत्वाचा प्रश्न आहे . -
सुमारसद्दीची सुरवात या आपल्या (नेहमी प्रमाणेच्या )फडतूस अग्रलेखात काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष मा ऱाहुल गांधी यांच्या संदर्भात- राहुल बाबा , संबोधून निरनिराळे दाखले देऊन टीका करण्याचा जो बाळबोध प्रयत्न केला आहे तो अतिशय हास्यास्पद आणि लाजीरवाणा आहे . 
काल परवाच  लोकमान्य टिळक यांची  पुण्यतिथी साजरी झाली . टिळक ,आगरकर , प्र. के. अत्रे  या महाराष्ट्रा ने देशाला दिलेल्या मोठया देणग्या होत्या . त्यांचे अग्र लेखवाचले असते तर  संपादकीय कसे असावे याची माहिती कुबेरांना झाली असती . भाजप नेत्यांच्या मांडीवर बसून कॉंग्रेस च्या विरुध्द आपला वैचारिक दरिद्री बोरू झिजवायचा हाच सध्या एक कलमी  आपला कार्यक्रम  दिसत आहे . 
आपण लोकसत्ताचे संपादक आहात ,परंतु आपण स्वतः लोकसत्ता वाचता किंवा काय या विषयी शंका आहे . आपल्या पान क्र ७ वरील एक परिच्छेदाच्या माहितीवर गजेंद्र चौहानांची नियुक्ती हि बातमी प्रसिध्द झाली आहे . त्यावरून त्यांना कसे विद्यार्थ्यांवर लादले जात आहे हे लोकांना समजले आहे . एफ टीआय आय वरील गजेंद्र चौहान यांची नियुक्ती , चि . राहुल बाबांना भले सुमार वाटो , - असे जेंव्हा आपण म्हणता तेंव्हा ती आपल्याला सुमार वाटत नसावी हे वाचकांना समजत नाही असे आपणाला वाटते काय ? सत्ताधाऱ्यांना विरोध करायचे हे कारण आपल्या लेखी फुसके असेल परंतु विद्यार्थ्यांच्या दृष्टीने तो आधार आहे . विध्यार्थ्यांना हि नियुक्ती बदला म्हणण्याचा अधिकार नाही हे म्हणून आपली नसलेल्या बुद्धीची कुवत आपण दाखवत आहात असे वाटते . हा अधिकार मागणे हि विद्यार्थ्यांची मुजोरी झाली असे लिहिताना आपला स्वाभिमान आपण आर. एस . एस . च्या शाखेत गहाण ठेवला की काय असे वाटते . कारण त्यांना ही ह्या बाबी हिंदू विरोधी वाटतात . कोंडी फुटण्यासाठी , चि. राहुल बाबांनी काही केले नाही असे आपल्याला वाटते , परंतु राहुल गांधी यांनी त्या बाबत मोदी सरकारने मन मोठे करावे हे सांगितल्याचे आपण सोयीस्कर रित्या विसरलात . २५० विद्यार्थी आणि एक बलवान सरकार यांच्यात विद्यार्थ्यांनी मनाचा मोठे पणा दाखवावा , की  सरकारने ? ,-  याची जाणीव ना सरकारला ना आपल्याला . "राजीनामा दयायला हे काही युपिए सरकार नाही " , असे कथीत थोर नेते राजनाथसिंह ह्यांनी सांगितलेले आहेच . जेथे हे सरकार भ्रष्टाचार करून राजीनामा देणार नाही हे स्पष्ट करते ते लोक अशा सुमार दर्जाच्या नियुक्त्या करून विद्यार्थ्यांची बौद्धिक वाताहत करत आहेत असे आपणाला वाटत नाही काय ? पक्षाच्या अंतर्गत बाबी ,परिस्थिती ,समीकरणे आणि घेतलेले निर्णय यांची बरोबरी विद्यार्थ्यांच्या रास्त मागणी सोबत करावी याने आपली वैचारिक दिवाळखोरी सिद्ध होते . 
याकुबला फाशी दिली हे उत्तम झाले असे ओवेसी म्हणत नाही ,तो गुजरात कांडाच्या आरोपींना फाशी कधी मिळणार असे भरकटणारे विधान करतो ,तद्वतच आपण देखील पात्रताहिन गजेंद्र चौहान यांची नियुक्ती सरकारने मागे घ्यावी असे म्हणत नाही , भलत्याच गोष्टींशी तुलना करण्यात बहुमोल वेळ वाया घालवत आहात . 
तसे पहिले तर आपण या पदावर आल्यापासून वेळ वाया घालाविण्याचेच काम करत  आहात हे वाचकांच्या केंव्हाच ध्यानी आलेले आहे . अरुण टिकेकर आणि कुमार केतकर  यांच्या सारख्या विद्वान लोकांनी लोकसत्ताच्या संपादक पदाची शान वाढविली होती , तेथे आपल्या सारख्या  "सुमार "दर्जाच्या वैचारिक पात्रतेच्या माणसाला बसविले त्याला लोकसत्ताचे वाचक विरोध करू शकत नाहीत कारण  "एक्स्प्रेस ग्रुप " खासगी संस्था आहे . तेथे कुणालाही आणून बसविण्याचा त्यांचा अधिकार आहे . परंतु एफ टीआय आय  ही काही कुणाच्या बापजाद्याची मालकी हक्क दाखविणारी संस्था नाही ,त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मागणीला मुजोरी मागणी म्हणण्याचा तुम्हाला कोणताही अधिकार नाही . पक्ष म्हणून घेतलेल्या चुकीच्या निर्णयांची शिक्षा काँग्रस भोगेल , व चूक दुरुस्त देखील करेल पण त्या साठी विद्यार्थांचे भवितव्य ,दिवस ,वेळ वाया घालविणाऱ्या सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय ? असा अग्रलेख लिहायला आपल्याला काही जमेल असे वाटत नाही . 
कळावे , धन्यवाद 


आपला स्नेहांकित 


धनंजय जुन्नरकर 
सचिव ,मुंबई विभागीय काँग्रेस कमिटी 
9930075444

No comments:

Post a Comment