Sunday 9 August 2015

कुठे स्व . राजीव गांधी ,कुठे मोदी ड्रामा ( नागा बंडखोरी विरुध्द )
अजून समझोत्याची कलमेही ठरली नाहीत तरी नागा लोकांचा ड्रेस घालून पंतप्रधान दिखावाबाजीला तयार ! असा कोणताही समझोता संध्याकाळी ७ वाजता होणार आहे याची कल्पना गृहमंत्री राजनाथ सिंह यांना साडेचार वाजेपर्यंत माहित देखील नव्हते . जेथे नागा लोकांची वस्ती आहे त्या आसाम ,मणिपूर ,आणि अरुणाचल प्रदेश च्या मुख्यमंत्र्यांना या बाबत काही माहीतही नाही . हे तिन्ही प्रदेश मिळून नागा लोकांना ग्रेटर नागा प्रदेश बनवायचा आहे हे कधीही शक्य नाही . अशा प्रकारे देश चालवणार काय ? स्व . राजीव गांधी यांनी पंजाब ,आसाम , मिझोराम यांच्याशी ऐतिहासिक करार केले . त्यानंतर त्या प्रदेशातील परिस्थिती सुधारली . येथील वंशवाद ,फुटीरता संपली . हे करार गोपनीय नव्हते . प्रसिद्धी साठी नव्हते . ठोस करार होते . त्यांचा आजही आधार मानला जातो . राजीव गांधींना असा ड्रामा करायची गरज वाटली नाही . ज्याच्या कडे बुद्धीची कमतरता असते तो दिखावा अधिक करतो हे सत्य पुन्हा उघड झाले . 

No comments:

Post a Comment