Friday 19 April 2019

"मै भी चौकीदार "? एक फुकाची वळवळ !


शुक्रवार दिनांक 22 मार्च 2019 रोजी संपादकीय पृष्ठावर , "मै भी चौकीदार " चळवळ ह्या शिर्षकाखाली भाजपा  माध्यम विभागाचे राष्ट्रीय प्रमुख आणि प्रवक्ते अनिल बलुनी ह्यांनी जो लेख लिहिला आहे त्याला प्रतिउत्तर देणारा लेख !

"मै भी चौकीदार "? एक फुकाची वळवळ !

महात्मा गांधी ज्यांच्या "प्रातः स्मरणीय"  लिष्ट मध्ये कधीच नव्हते आणि आयुष्यभर ज्यांनी गांधींचा दुःस्वास  केला, त्या मातृ-पितृ विचार धारेतून आलेल्या भाजपच्या नेत्या प्रवक्त्याना तोंड देखलेपणाने का होईना गांधीजींची उदाहरणे द्यायची पाळी आली ही त्यांच्या साठी शोकांतिकाच आहे.
"मै भी चौकीदार" ह्या लेखात ते बेमालूम पणे महात्मा गांधी ह्यांचे आंदोलन आणि आदरणीय विनोबा भावे ह्यांची 1952 सालची "भूदान चळवळ "ह्यांच्याशी तुलना करून प्रधान सेवक मोदी ह्यांना त्या पात्रते ला नेण्याचा प्रयत्न करतात. पण गांधी आणि भावे ह्यांच्याशी तुलना करायला भाजपात अजून कुणी जन्मलेले नाही, पुढे जन्मायची शक्यता ही दिसत नाही.
मुळात "मै भी चौकीदार" ही चळवळ म्हणायच्या पात्रतेची तरी  वळवळ आहे काय??

मुदलात 2014 ला चाय वाला, गुजरात मॉडेल, अच्छे दिन , मेक इन इंडिया ,स्टार्टअप इंडिया च्या घोषणा कुठे कधी हरविल्या आणि "चौकीदार चोर है " ही घोषणा लोकांनी कशी उचलली ,हे भाजपच्या चाणक्यानां ही कळले नाही.

देश, राष्ट्रवाद , भारतमाता की जय, वंदे मातरम ,ह्या सर्व बाबी, मतपेटीतून विजयाचा मार्ग शोधण्यासाठीच्या युक्त्या होत्या ,हे जनतेला लोकसभेच्या शेवटी शेवटी समजायला लागले आहे. भाजपचे प्रवक्ते अनिल बलुनी ह्यांच्या मते मोदींच्या  "मै भी चौकीदार"
ह्या ट्विट ने क्रांती केली आणि सामाजीक चळवळ उभारली गेली. ज्या पक्षाचे कोटीच्याकोटी सदस्य 
मिस कॉल ने तयार होतात, ज्यांच्याकडे समाजमाध्यमाच्या निरनिराळ्या विभागासाठी  खर्च करायला पैसे आणि टीम आहे त्यांना हे सर्व सहज शक्य आहे.
भाजपच्या एका प्रवक्त्याच्या मते मोदीजी विष्णूचा अवतार देखील आहेत. त्या अर्थाने मोदींजींचा जन्म स्वातंत्रपूर्व झाला असता तर 150 वर्षे लढण्याची गरज देखील नसती. त्यांच्या एका ट्विट ने देखील चळवळ उभी राहिली असती आणि ब्रिटिश सरकार मागे वळून न बघता पळत सुटले असते.

"सबका साथ सबका विकास " ही घोषणा तर सर्वात जास्त ट्रोल झालेली आणि हल्ली तर विनोदांसाठी वापरली जाणारी घोषणा आहे.

भ्रष्टाचार आणि भाजपा हे समानार्थी शब्द आहेत, परंतु काही पेड माध्यमांमुळे लोक विस्मृतीत गेले होते.,ते आता खाडकन जागे झाले आहेत . 
अनिल बलुनी ह्यांचे एक वाक्यातील 3 शब्द आवडले ते म्हणजे " लाल किल्ल्याच्या सदरेवरून ". आपण खूप काही ऐतिहासिक लिहत असल्याचे भाजपच्या बोरू बहाद्दरांना वाटत असते पण ते तसे नाही. "सदर लाल किल्ला ही भाड्याने देऊन नको तिकडे व्यापार दाखवायचा मूर्खपणा मोदी सरकार ने केलेला आहे. एकाच मित्राला 5 एअर पोर्ट भाड्याने दिले तेंव्हा अनुभव पाहिला गेला नाही.

"2014 सबका साथ सबका विकास " ह्या घोषणेचे  "मेरा झूठ सबसे मजबूत" ह्या घोषणेत लोकांनी कधी रूपांतर केले ते भाजपच्या धुरीणींना कळले ही नाही.
रोजगाराचे आकडे जाहीर करायला 56 इंच छाती घाबरते हे जनता बघत आहे. 12,000 शेतकऱ्यांच्या आत्महत्या ,रोज शाहिद होणारे जवान , पाकिस्तानला जाऊन केक खाणे,पुलवामच्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात 44 जवान शहीद झाले त्याला महिना झाला नाही तर त्यांच्या पंतप्रधानाला चोरून एसएमएस पाठविणे , ह्या गोष्टींची नोंद जनता घेत नाही असे वाटते काय? 

वर्षाला 2 कोटी नवीन रोजगार राहिले बाजूला , काँग्रेस काळात लागलेल्या 1 कोटीच्या वर नोकऱ्या गेल्या. शेतमजूर घरी बसले. मजुरी द्यायला पैसे नाही. एम टी एन एल च्या कामगारांना ,जेट च्या कामगारांना , छत्तीसगड च्या चौकीदारांना 4 ते 6 महिने पगार मिळत नाहीए. जगात सर्वात मोठा पुतळा सरदार पटेल ह्यांचा बनविण्यासाठी प्रचंड खर्च केला त्या कामगारांना पगार द्यायला पैसे नाहीत. 70 वर्षात अशी भीषण परिस्थिती आली नव्हती.
जनतेचा 1 रुपयाही संसदेच्या मंजुरी शिवाय खर्च करता येणार नाही, हे लोकशाहीचे तत्व आहे. ह्या तत्वालाही केराची टोपली दाखविण्यात आलेली आहे.
संसदेच्या मंजुरीशिवाय 99,610 कोटी रुपये खर्च केले गेले आहेत.कॅग ने यावर ताशेरे मारले आहेत. गोदी मीडियात ह्याची बातमी देखील नाही.अर्थमंत्रालायचे ह्या बाबींकडे दुर्लक्ष आहे.हे जाणीवपूर्वक आहे. जिकडे चौकीदारी करायला पाहिजे तिथे सर्व कथित चौकीदार डोळ्यावर झापडे लावून मूग गिळून बसलेले आहेत.

न्यायाधीश पत्रकार परिषद घेत आहेत. पत्रकारांचे खून होत आहेत. न्यायाधीश संशयास्पद रित्या मृत्यु मुखी पडले आहेत, केस घ्यायला तयार नाहीत,  खऱ्या बातम्या दिल्या तर ते चॅनल केबल वरून गायब करण्यात येत आहे. संपादकांना घरी बसविले जात आहे. असा भारत कुणी अपेक्षिलेला नाही.

आंनदी देशाच्या क्रमवारीत सतत 3 वर्षे आपला क्रमांक घसरत गेलेला असून 156 देशांच्या क्रमवारीत तो 140 वर गेलेला आहे. आपण 16 जणांच्या पुढे आहोत ह्यात तर मोदींजींना आनंद होत असेल तर आपण काय बोलणार.?
पाकिस्तान चा 67 तर बांगलादेश चा 125 वा क्रमांक आहे. आपण त्यांच्याही मागे आहोत.

नोट बंदीतही हेच केले.4 नोव्हेंबर 2016 पर्यंत 17.97 लाख कोटी रोख रुपये चलनात होते. डिजिटल इंडियाची खोटी जाहिरातबाजी करून लोकांना पुन्हा फसविले. ह्या चलनात आता 19.44 % वाढ झालेली असून 21.41 लाख कोटी रुपये रोख चलन बाजारात उपलब्ध आहे. हजारो नोकऱ्या गेल्या , कारखाने बंद पडले, लायनीत उभे राहून 100 च्या वर मृत्यू मुखी पडले पण चौकीदाराला त्याचे सोयरसुतक नव्हते.
राफेल विमान घोटाळा हा इतिहासातील सर्वात मोठा घोटाळा म्हणून नोंद केला जाईल अशी चिन्हे आहेत. चौकीदार प्रामाणिक आहे तर संयुक्त संसद समिती का नेमली जात नाही? 

माजी सीबीआय निर्देशक आलोक वर्मा राफेल ची फाईल उघडतील ह्या भीतीने रातोरात त्यांची बदली करणे, न्यायालयाला शपथेवर खोटे सांगणे  देशाच्या महत्वाच्या संस्थांना बटीक बनवून टाकणे हे काही लपवून ठेवण्या सारखे नाही.

हाय प्रोफाइल 2 जी घोटाळ्याचे खोटेपण लोकांना समजले आहे. तत्कालीन ए. राजा समवेत 17 आरोपींना न्यायालयाने निर्दोष सोडलेले आहे.
भाजपा आणि मोदी सरकार ही एक इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी झालेली आहे.
सतत नवीन घोषणा देणे , कुणी सरकार ला प्रश्न विचारले तर राष्ट्रवादी घोषणा देणे, त्याला देशद्रोही म्हणणे हेच गेले 4 साडेचार वर्षे लोक बघत आलेले आहेत.
हे आता जास्त दिवस चालणार नाही.
 मतदारांमध्येही एक गावरान शहाणपणा असतो, तेथे वारंवार चाणक्य नीती चालत नाही. 
"बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर" ही घोषणा मोदी सरकार ला माहीत नसावी . लोकांना माहीत आहे.
मोदीजी अखलाक च्या मृत्यु वर ,नजीब च्या गायब होण्यावर , दलितांना झाडाला टांगून मरेस्तोवर मारण्यावर ,झुंडशाही ने विशिष्ट समाजाच्या लोकांच्या हत्या होण्यावर काहीच ट्विट करत नाहीत.
 त्यावर ट्विट करून काही चळवळ उभारल्याचे आम्ही कुठेही पाहिले नाही.
गांधीजींच्या 71 व्या स्मृतिदिनी त्यांच्या पुतळ्यावर बंदुकेने गोळ्या झाडणाऱ्या साध्वी चे दर्शन जगाने घेतले. त्यावेळी "मै मोहनदास गांधी " असे ट्विट करणे आणि चळवळ उभी करणे ह्याची इच्छा प्रधान सेवकांना झाली नाही. तेही देशाने पाहिले आहे. 
आज जर गांधींचा खून गोडसेने केला असता तर तो पुराव्याअभावी नक्की सुटला असता आणि लोकसभा लढविण्यार्यांच्या यादीत त्याचे नावही दिसले असते.
असो.
कितीही प्रयत्न केला तरी, "चौकीदार चोर आहे " ही घोषणा विस्मृतीत जाणार नाही आणि त्यापासून भाजपाला पळताही येणार नाही हेच सत्य आहे.

- धनंजय जुन्नरकर
सचिव, प्रवक्ता -टिव्ही पॅनलिस्ट
मुंबई प्रदेश काँग्रेस 
9930075444

Show quoted text

1 comment:

  1. Did you hear there's a 12 word phrase you can speak to your crush... that will induce intense feelings of love and impulsive appeal for you buried within his chest?

    That's because deep inside these 12 words is a "secret signal" that fuels a man's impulse to love, please and protect you with all his heart...

    =====> 12 Words That Fuel A Man's Desire Impulse

    This impulse is so built-in to a man's mind that it will drive him to try better than ever before to make your relationship as strong as it can be.

    As a matter of fact, fueling this dominant impulse is so essential to having the best possible relationship with your man that the second you send your man one of the "Secret Signals"...

    ...You will instantly notice him expose his soul and mind to you in such a way he haven't experienced before and he'll perceive you as the only woman in the universe who has ever truly attracted him.

    ReplyDelete