Saturday 14 March 2015

भारतीय राज्य घटना व मानवी हक्क

 भारतीय राज्य घटना व मानवी हक्क 




भारतीय राज्य घटनेने सर्वांना समान अधिकार व हक्क दिलेले आहेत . हे अधिकार पूर्णत्वास नेण्यासाठी शासनाने अनेक महत्वपूर्ण निर्णय ,ध्येय धोरणे व योजना कार्यान्वित केलेल्या आहेत . भारतीय राज्य घटनेतील खालील कलमे राज्य घटना व मानवी हक्कांचा परस्पर अन्योन्न संबंध स्पष्ट करतात . 
१) कलम १४- कायद्याने समानता व समान संरक्षण 
२) कलम १५ - (३) राज्य शासन महिला व बालकांसाठी विशेष तरतूद करू शकते . 
३) कलम १६ -  समान संधी 
४) कलम २१ - कायद्याच्या प्रक्रियेशिवाय व्यक्तीच्या जीवित व स्वातंत्र्याच्या हक्काचा संकोच करता येणार नाही . 
५) कलम २३ - मानवाचा व्यापार अथवा वेठ बिगरीस प्रतिबंध 
६) कलम -३९- स्त्री -पुरुष दोघांना समान वेतन . 
७)कलम ४२ - कामाच्या ठिकाणी न्याय्य व सुरक्षितता आणि प्रसुती सहाय्य देण्याची सोय 


८) कलम ५१ - स्त्रियांच्या प्रतिमेला हानी पोहचविणाऱ्या प्रथा बंद करणे . 

No comments:

Post a Comment