Saturday 14 March 2015

इच्छा मरणाचा अधिकार

सादरकर्ता
श्री धनंजय चं . जुन्नरकर


इच्छा मरणाचा अधिकार


प्रस्तावना

मानवी हक्क  या विषयाचा अभ्यास करत असताना " इच्छा मरण या विषयाची निवड करावी असे प्रकर्षाने वाटले . मृत्यू म्हटले की एक प्रकारची घबराट -थरकाप ! त्यामुळे मृत्यू  विषयी बोलणे देखील अमंगळ . मृत्यू ची सांगड  पाप पुण्याशी घातल्याने श्रद्धा अंध श्रद्धा यांच्या गुंत्यात सामान्य माणूस पुन्हा भरडला जातो . निरोगी माणूस हा मृत्यूला चार हात लांब ठेवूनच जगत असतो . पण तेच शरीर रोग ग्रस्त झाले तर जगण्यासाठी औषधे व औषधांसाठीच जगणे झाले , तर मग जगायचे तरी कशासाठी ? हा प्रश्न मनात आल्या वाचून राहत नाही . जिवंत माणसाची हत्या करणे कायद्याने -नैतिकतेने गुन्हा आहे . स्वतःची हत्या करणेम्हणजेच आत्महत्या करणे  हा देखील कायद्याने गुन्हा आहे .   पण जर रोगिष्ट होऊन ,मरणाची वाट पहात कण्ह्त -कोमात जाऊन बिछान्यावर दुसर्याच्या मदती शिवायच  जगणं टाळण्यासाठी इच्छा मरणाचा मार्ग चोखाळला तर त्यात वावगे ते काय ?
इच्छा मरणाला कायदेशीर अधिष्ठान प्राप्त व्हावे -देशोदेशीचे कायदे अभ्यासावेत -एक चळवळ निर्माण व्हावी -त्या संबंधी समाजात चर्चा निर्माण व्हावी त्यासाठी चा हा एक छोटासा  प्रयत्न .


 या विषयाची निवड का केली  ?

मानवी हक्क या अभ्यासक्रमासाठी इच्छा मरणाचा अधिकार या विषयाची निवड फार जाणिव पूर्वक केलेली आहे . जागतिक दृष्ट्या मानवी हक्कांना प्रचंड महत्व असून त्यांना बाधा आणणार्यांवर कडक कारवाईची अनेक उदाहरणे आहेत . स्त्री -पुरुष असमानता ,धर्म - वंश -जात  असे भेद निर्माण करून त्याच्या अनुशंघाने मानवी हक्कांची ग्राह्यता तपासली जात होती . बाळ रडत नाही - तर आई देखील दुध पाजत नाही तव्दतच हक्कांचे आहे .  नुसते मागितले आणि मिळाले   असे  एकही उदाहरण शोधूनही सापडणार नाही . हक्कांसाठी संघर्ष -क्रांती -लढा -चळवळ हे क्रम प्राप्त आहे . इच्छा मरणाचा अधिकार हा ही असाच एक हक्क आहे . त्या बाबत समाज धारणा -देशो देशीचे कायदे व इच्छा मरणाची आवश्यकता याचा उहा पोह होणे गरजेचे आहे .
भारतीय संस्कृतीत महाभारतातील महत्वाची व्यक्ती रेखा म्हणजे महा महिम भीष्म पितामह यांनी इच्छा मरणाचा अधिकार गाजवला होता . जिवंत समाध्या देखील इच्छा मरणच  होते .
त्यांना तात्विक ,धार्मिक कारणे असली तरी तटस्थ्पणे निरीक्षण केले असता इह लोकचा अवतार आपल्याला हवा तेंव्हा संपविणे हे देखील इच्छा मरणच आहे .
या सर्व बाबींचा शात्रोक्त -पुराणोक्त ,आणि विज्ञानोक्त अभ्यास करणे हे अत्यंत गरजेचे आहे ,त्या साठीच सदर विषयाची निवड केलेली आहे .



विवेचन


इच्छामरण हा विषय निवडल्यावर आणि त्या संदर्भात घडत असणाऱ्या सभोवतालच्या घटना बघितल्यावर फार काही आशादायक चित्र समोर येत नाही . एखाद्या जनहित याचिके मुळे अथवा एखाद्या रुग्णाने मारण्यासाठी न्यायालयाकडे केलेल्या अर्जामुळे चार - दोन दिवस वृत्तपत्रात बातम्या येतात . मोठ्या वृत्त पत्रांचे संपादक तज्ञांकडून लेख लिहून घेतात  व आपले काम संपले असे मानून सर्व जण पुन्हा कोषात जातात .
स्वयं पाकाच्या सिलिंडर चे भाव वाढणे ,नळाला पाणी न येणे ,रिक्षा भाडे वाढणे अशा गोष्टींसाठी हजारोंचे मोर्चे निघतात पण जी व्यक्ती मृत्यू पेक्षाही भयंकर स्थितीत जगत असते तिच्या सोडवणुकीसाठी फार मोठी मोहीम आपल्याला ऐकायला - पाहायला मिळत नाही .
आज कुठल्या हॉटेलात काय खाल्ले त्याचा त्वरित फोटो काढून तो फेसबुक वर अपलोड करून जगाच्या स्पर्धेत आपण कमी नसल्याचे दांभिक पणे दाखवत असतो ,परंतु सामाजिक माध्यमांचा उपयोग नवीन उपयुक्त चळवळ उभारण्यासाठी करत नाही . किंबहुना  तसे करण्यास कमी पडतो  हा आपल्या सामाजिक जाणिवांचा आणि  मुर्दाड मानसिकतेचा पराभव आहे .
जन्म कुठे व कधी घ्यावा हे आपल्या हातात नाही . परंतु मृत्यू कुठे व कसा असावा हे आपण ठरवू शकतो . जेंव्हा देवाने दिलेले निरोगी शरीर रोग ग्रस्त होते ,आतून बाहेरून खंगते - सडते , बरं होण्याची सर्व लक्षणं संपतात , रोजचं  जगणं कठीण आणि प्रत्येक श्वास नरक वाटायला लागतो तेंव्हाही आपण मानाने -सन्मानाने सर्वांना शेवटचं डोळे भरून पाहून जगाला अलविदा म्हणणार नसू तर हा देखील प्रचंड मोठा अन्याय आहे . .
भारतात रोज १००० मोर्चे कुठेना कुठे तरी निघत असतात . सन्मानाने मरण्याच्या हक्कासाठी - त्या पिडीतांसाठी आपल्या  निरोगी माणसांनी एकही मोर्चा काढल्याची बातमी नाही . या परिस्थितीचा  खेद बाळगावा की वैषम्य व्यक्त करावं की आपणही कोषात जावं  नवीन जनहित याचिका येण्याची वाट पाहात  ?  

No comments:

Post a Comment